झडपे जसा ज्योतीवरती पतंग ।
मनानें असें ना आम्ही होऊं व्यंग ।।
चितेमाजीं काष्ठे जशी भस्म होती ।
विकारासवें आमुची हीच रीती ।।४२।।
नाही मनाहूनि दुजे अति तीक्ष्ण शस्त्र ।
निर्धार युक्त मती हे अति दिव्य अस्त्र ।।
हिंदुमनास चढवूं शिवभूपधार ।
हें हिंदुराष्ट्र घडवूं आम्ही धारदार ।।४३।।
जिथें लाथ मारुं तिथें काढू पाणी ।
असे हिंदू सारे करूं स्वाभिमानी ।।
जिथें जाऊं पाहूं तिथें जिंकू लोक ।
जनांच्या मधे निर्मुं या राष्ट्रभूक ।।४४।।
जिवाच्यासवें मृत्यु हि जन्म घेतो ।
सूर्योदयाच्या सह अस्त येतो ।।
असे ज्यास आदि तया अंत आहे ।
भवाची नदी ही अखंडित वाहे ।।४५।।
नसे शील तो सूकराहून हीन ।
तयाचे असे बोलणें श्वानज्ञान ।।
अशांना कधीं ना जनीं स्थान द्यावे ।
दिवाभीत त्याच्या मुखा ना पहावे ।।४६।।
वरूनीं दिसे तें असे आंत अन्य ।
जणूं साधू भासे परी वृत्ती वन्य ।।
दुरुनी पाहाता जणूं सिंह वाटे ।
जगीं भासते तें असे सर्व खोटे ।।४७।।
नसे दुर्गुणावाचुनी शत्रू कोणी ।
अशी जाण ठेवा स्वतः नित्य ध्यानीं ।।
मिठाचा खडा नासवे सर्व दूध ।
त्वरें दुर्गुणांचा करा लक्ष्यवेध ।।४८।।
मनाच्या रणीं जो पराभूत झाला ।
कधीं ही जयश्री वरें ना तयाला ।।
महावज्र निर्धार ज्यांच्या उरांत ।
यशश्री भरें पाणी त्यांच्या घरांत ।।४९।।
जरी राजसत्ता विरोधांत गेली ।
नका वाकवूं मान केंव्हा ही खाली ।।
जरी कां कधीं अग्नीची भेट होई ।
जळे ना कधीं स्वर्ण उजळून जाई ।।५०।।
धनाचा त्वरें मोह सोडा सवंग ।
धरे तो कुणी शील होईल भंग ।।
नसे शील तो प्राणी मेल्या समान ।
जणूं लूथ भरतां जगे शूद्र श्वान ।।५१।।
मुसळास पालवी कधीं तरी कां फुटेल? ।
झाडावरी न म्हसरुं कधीं हि चढेल ।।
सूर्योदरीं न उपजे हिमशैलखंड ।
प्रेते तसेंच क्लिब ना करतील बंड ।।५२।।
सिंहास कां कुणी कधीं अभिषेक केला ।
तरी हि वनांत मृगराज स्वयंभु ठेला ।।
दुर्दांत दाहक ज्वलंत हरिसमान ।
हे हिन्दुराष्ट्र घडवूं आम्ही युद्धमान ।।५३।।
उजळावयास पुरतो नभीं एक भानु ।
जगतास देऊं शकते पय कामधेनु ।।
आधार कोण जगतीं खलु या धरेस ।
सामर्थ्यवान द्युतिमान हि हिन्दुदेश ।।५४।।
चिलटास ऊंची न कळे कधीं अंबराची ।
बदकास खोली न कळें कधीं हि तळयाची ।।
अंधास दीप्ती नुमजे जशी भास्कराची ।
महती न षंढ आकळे कधीं हिन्दुतेची ।।५५।।
लक्ष्यावरील कधीं चित्त ढळूं न देऊं ।
संकल्पसिद्धिस्तव हि अति शीघ्र धावू ।।
क्षिती ना मनांत अणुमात्र हि आपदांची ।
ही जात कडवी आमुची शिवपाईकांची ।।५६।।
सह्याद्रि सांगत उभा किती काळ झाला ।
शिवभूपस्पर्श घडला इथल्या धुळीला ।।
भाळास लावून उठूं जरी या धुळीस ।।
जिंकाल पूर्ण अवनी वधुनी अरीस ।।५७।।
अंधास जाणिव नसें कधीं दर्पणाची ।
बहिऱ्यास महति न कळे कधीं संगिताची ।।
चिलटे न मारूं शकती कधीं हि भरारी ।
शूरा विना न उमगे जगतीं मुरारी ।।५८।।
वास्तूस काष्ठ उपयुक्त न पोपईचे ।
दीपास इंधन न रुचे कधीं हि जळाचे ।।
भाला कधीं न करणें कधीं नवनीताचा ।
राष्ट्रास तारुं न शके पथ षंढतेचा ।।
हिंदुस तारुं न शके पथ गांधीतेचा ।।५९।।
🏰 श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान 🏰
🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
।। जय भवानी जय शिवराय ।।